शेतकऱ्यांना मिळणार १२,२०० रुपये प्रति हेक्टर , झिरो बजेट शेती

Shares

शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीचा (Natural Farming) वापर करून अधिकाधिक प्रमाणात शेती करावी यासाठी केंद्र सरकार (Central Government) अनेक प्रयत्न करत आहेत. सरकारने आता झिरो बजेट शेतीसाठी (Zero Budget Farming) अगदी तळागळापर्यंत यंत्रणा राबवली आहे.

अगदीच सर्व शेतकऱ्यांपर्यंत कशी झिरो बजेट शेतीची माहिती पोचवता येईल याकडे जास्त लक्ष देत असून शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा सरकारचा हेतू आहे. यामध्ये कृषी ( Agriculture ) विज्ञान केंद्रांना देखील शामिल करून घेतले आहे. झिरो बजेट शेतीचा प्रचार तसेच प्रसार व्हावा यासाठी शासन संपूर्ण प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा (Read This) या पिकाची शेती करून दीड ते दोन वर्षात ६ लाख रुपये कमवा

ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांसाठी नाबार्डच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. नाबार्डकडून शेतीशी निगडीत असलेल्या स्टार्टअप्सना फंड दिला जाणार आहे. केंद्र सरकारने शेतकरी आणि शेतीसाठी भरीव मदत दिली आहे. तसेच यावेळी जास्तीत जास्त जमीन जलसिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

आतापर्यंत ४.०९ लाख हेक्टर क्षेत्र झिरो बजेट शेती अंतर्गत कव्हर करण्यात आले आहे. तर शेतकऱ्यांना ३ वर्षासाठी १२,२०० रुपये प्रति हेक्टर दिले जाते.

नैसर्गिक शेती अधिक फायद्याची

सरकारने नैसर्गिक शेतीवर जास्त लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले असून त्यासाठी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. कृषी विज्ञान केंद्राला देखील यामध्ये शामिल करून घेतले आहेत जेणेकरून गावपातळीवर झिरो बजेट शेती पद्धतीचे प्रात्यक्षिक तसेच प्रयोग करून दाखवण्यात येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्व पटेल. नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे त्यामुळे त्यांना नैसर्गिक शेतीचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे.

हे ही वाचा (Read This) या फळाची लागवड करून मिळवा वर्षाला २५ लाख हमखास

काय आहे झिरो बजेट शेती

नैसर्गिक शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण – गोमुत्राचा ( Cow Urine ) जास्त वापर करणे यामुळे वाफ्यात पाणी( Water) टिकून राहते. बैलांच्या मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते.
नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केल्यास पिकांची उत्तम वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होते.

हे ही वाचा (Read This )  लाल पत्ताकोबीच्या मागणीत वाढ, मिळवून देईल अधिकच नफा

नैसर्गिक शेतीस अत्याधुनिक तंत्राची जोड दिल्यास उत्पादनात जास्त प्रमाणात वाढ होईल. अनेक शेतकऱ्यांना भीती आहे की नैसर्गिकरीत्या शेती केल्यास उत्पादनात घट होईल. परंतु असे न होता त्याचा फायदाच होणार आहे. त्याचबरोबर रासायनिक खते, कीटकनाशके यांचा खर्च देखील वाचेल.

शेती मध्ये हा बदल घडवून आणणे ही आता काळाची गरज झाली आहे. गुजरात , अनेक शेतकऱ्यांनी हा बदल स्वीकारला आहे. हा बदल देशातील सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर स्वीकारावा. जेणेकरून त्यांचा अधिक फायदा होईल.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *