शेतकऱ्यांसाठी अपघात विमा पुन्हा सुरु, अपघातात मृत्यू झाल्यास २ लाख तर अपंगत्व आल्यास १ लाख.

Shares

काही दिवसांपूर्वी मध्यंतरी शेतकरी अपघात विमा योजनेची प्रक्रिया खंडित करण्यात आली होती. या काळात नुकसान भरपाईसाठी दावे दाखल झाले होते. मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत नव्हती. आता लवकरच संबंधितांच्या खात्यावर रकम जमा केली जाणार आहे.

हे ही वाचा (Read This)  असा काढा घरी बसून जमिनीचा ऑनलाईन नकाशा, महाभूमी अभिलेख

शेतकरी अपघात विमाच्या रकमा त्वरित बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या सूचना कृषी आयुक्ताने दिल्या आहेत. आता शेतकरी कुटुंबांना अनेक दिवसानंतर थोडा दिलासा मिळाला आहे.

कृषी आयुक्तालयाने विमा योजना खंडित असतांना आलेल्या शिफारशी राज्य सरकारकडे पाठविल्या असून यास आता मंजुरी मिळाली आहे.

योजना खंडणीत होण्यामागील कारण

स्व. गोपीनाथ मुंडे योजना ही १ डिसेंबर २०१६ पासून राबवली जात असून शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू किंवा त्यांना अपंगत्व आले तर त्यांना मदत म्हणून थोडी रक्क्म दिली जाते. मात्र या योजनेचा डिसेंबर २०२० ते एप्रिल या कालावधीमध्ये योजनेचा करार संपला होता. त्यामुळे ही योजना बंद झाली होती.

मात्र या दरम्यान शेतकऱ्यांचे दावे स्वीकारले जात असून त्यांना प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळत नव्हती. तर शेतकऱ्यांच्या दाव्यास प्रशासकीय मजुरी नव्हती. परंतु आता नव्याने करार झाल्यामुळे विम्याचा मार्ग खुला झाला आहे.

हे ही वाचा (Read This) पिकांच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी गंधक महत्वाचे

या योजनेचे स्वरूप

अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबास २ लाख रुपये आणि जर त्यांना अपंगत्व आले तर १ लाख रुपये देण्यात येणार आहे. आता पर्यंत २३ कोटी ३६ लाख अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ही रक्क्म मिळणार आहे.
तर अपघातामध्ये अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना १७ लाख रुपये मिळणार आहे.

हे ही वाचा (Read This) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग

अपघात विमा मिळण्याची प्रक्रिया काय आहे ?

शेतकऱ्याचा अपघात झाल्यास पोलीस अपघात झाल्यास पोलिस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, सातबारा, आठ ‘अ’, ६ क, ६ ड, मृत्यृ प्रमाणपत्र, ज्यांचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचे वारसा प्रमाणपत्र, वारसा अर्जदार आदी कागदपत्रे ही कृषी विभागात जमा करावी लागतात.

नियुक्त केलेल्या कंपनीकडे कृषी विभाग कागदांची पूर्तता करतात. त्यानंतर योग्य चौकशी नंतर शेतकऱ्यास किंवा शेतकऱ्यांच्या कुटुंबास ही विमा रक्कम दिली जाते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *