हरभऱ्याच्या बाजारपेठेतील दराने शेतकऱ्यांना केले निराश

Shares

मागील काही महिन्यापासून सगळीकडे केवळ कापूस आणि सोयाबीनची चर्चा होत आहे. आता ४ दिवसांपूर्वी बाजारात रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. हरभऱ्याचा पहिला पेरा असून आवक होत होत असली तरी हरभऱ्यास शेतकऱ्यांना निराश करणारे दर आहे. हरभऱ्यास प्रतिक्विंटल प्रमाणे ४ हजार ५०० रुपये दर आहे. तर खरिपातील सोयाबीनचा दर हा कासव गतीने वाढत आहे असे म्हणण्यास हरकत नाही. शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ६ हजार ४०० असा दर मिळत आहे. आता रब्बी हंगामातील पिकांची आवक सुरु झाली आहे.

ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान

शेतकरी हमीभाव केंद्राच्या प्रतीक्षेत

आता रब्बी हंगामातील पिकांची आवक होण्यास सुरुवात झाली असून हरभऱ्याचे बाजारात आगमन झाले आहे. सुरुवातीच्या काळातच लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये १५ हजार पोते दाखल झाले आहेत. मात्र हरभऱ्यास प्रति क्विंटल प्रमाणे ४ हजार ५०० रुपये दर मिळत आहे तर केंद्र सरकाने हरभऱ्यासाठी ५ हजार ३०० असा दर निश्चित केला आहे. त्यामुळे हमीभाव आणि खुल्या बाजारातील भाव यांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. सध्या फक्त पहिल्या टप्प्यातील हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. अजून काही दिवसानंतर जास्त प्रमाणात आवक सुरु होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरु झाले तर शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्राच्या प्रतीक्षेत आहेत.

ही वाचा (Read This ) सोयाबीन साठवणुकीपेक्षा विक्रीवर भर? लवकरच उन्हाळी सोयाबीनचे आगमन

बाजारपेठेतील सध्याचे चित्र
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता हरभऱ्याची आवक सुरु झाली. रब्बी हंगामात उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ज्वारी-गहू या मुख्य पिकांकडे पाठव फिरवली आहे. यंदा हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक झाला आहे. सोयाबीनला ६ हजार ४०० प्रति क्विंटल, तुरीला ६ हजार १०० तर हरभऱ्याला ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *