महाराष्ट्र बंद !

Shares

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेर येथे शेतकऱ्यांना चिरडल्या गेल्यामुळे हिंसाचार झाला आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष ने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचे सांगितले जात आहे.याचा एक विडिओ देखील समोर आला आहे . शिवसेना , राष्ट्रवादी , काँग्रेस यांनी झालेल्या हिंसाचार निषेधार्थ आज ‘ महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. महाराष्ट्र बंद मध्ये अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व सेवा बंद आहेत. नाशिक , पुणे , नागपूर येथील बाजारसमित्या पूर्णतः बंद आहेत तर मुबई , सोलापूर , औरंगाबाद येथील बाजारसमित्या काही प्रमाणात बंद आहेत. बाजारसमित्या बंद असल्या कारणाने लाखोंचा व्यवहार ठप्प झाला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दर्शवला आहे तर अनेकांनी आपली कमी सुरळीत सुरु ठेवली आहेत. बेस्ट बंद असल्या कारणाने नौकरदारांना फटका बसला आहे. रिक्षा आणि टॅक्सी सुरळीत सुरु असले तरी रिक्षा चालक दगडफेक होण्याची भीती दर्शवत आहेत. जागोजागी पोलिसांचा कडक बंदोबस्थ केला गेला आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *