सोयाबीन ९ हजरांच्या दिशेने जाणार का ? जाणून घ्या आजचे दर

Shares


आतापर्यंत वाढीव दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. शिवाय जानेवारी महिन्यात यंदाच्या हंगामातील विक्रमी म्हणजेच ७ हजार ६०० असा दरही मिळाला होता.
परंतु शेतकऱ्यांना यापेक्षा दर वाढतील अशी अपेक्षा होती. पण आता दर स्थिरावले आहेत. त्यामुळे आहे त्याच दरात विक्री करावी की अजून वाढीव दराची वाट पहावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

हे ही वाचा (Read This ) सोयाबीन पिकाला पर्यायी पीक ? ८० दिवसात मिळणार उत्पन्न

सोयाबीनचे दर वाढून पुन्हा घटल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. विक्री केली तर मध्यंतरीच्या तुलनेत क्विंटलमागे ४०० रुपये नुकसान सहन करावे लागणार आहे. तर विक्री केली अन् भविष्यात दर वाढले तर. या विवंचनेत सध्या शेतकरी आहे. दरात किंचित सुधारणा झाली आहे.

सोयाबीनचे आजचे दर

soybin bhav

मागील महिन्यात सोयाबीन ७ हजार ६०० चा विक्रमी दर मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ७ हजार २०० रुपयांवर सोयाबीन स्थिरावले होते. त्यामुळे पुन्हा आवक कमी झाली होती. या आठवड्यात मात्र, वाढीव दराबाबत सकारात्मक बदल होताना दिसत आहे.

हे ही वाचा (Read This ) या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा

दिवसाकाठी ५० रुपयांची वाढ झाल्याने ७ हजार २०० वर असलेले सोयाबीन हे ७ हजार ३५० वर येऊन ठेपले आहे. त्यामुळे पुन्हा सोयाबीनच्या दरातील बदलाने शेतकरी समाधानी राहणार की साठवणूकीवरच भर देणार हे पहावे लागणार आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरात होत असलेली सुधारणा ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.

हे ही वाचा (Read This ) असा काढा घरी बसून जमिनीचा ऑनलाईन नकाशा, महाभूमी अभिलेख

शेतकरी पुन्हा संभ्रमात

सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याच्या दरात थोड्याबहुत प्रमाणात का होईना वाढ झालेली आहे. तुरीला हमीभावापेक्षा खुल्या बाजारपेठेत अधिकचा दर आहे तर हंगामाच्या सुरवातीच्या तुलनेत आता हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाली आहे.

दरात वाढ झाल्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन १८ हजार पोते, हरभरा ३५ हजार तर तुरीची आवक ही १८ हजार पोत्यांची झाली आहे. अखेर हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना बाजार समितीमध्ये रेलचेल निर्माण झाली आहे. सध्या या तीन शेतीमालाचीच अधिकची आवक आहे. सोयाबीन आणि तुरीची विक्री करावी की साठवणूक हा प्रश्न अजूनही शेतकऱ्यांना संभ्रमात टाकत आहे

सध्या सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी उपटून सोयाबीनची लागवड केली आहे. हवामान बदलामुळे या पिकाला पाहिजे तशी फुले येत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *