महावितरणच्या नवीन योजनेमुळे या जिल्ह्यातील शेतकरी थकबाकीमुक्त, योजना ३१ मार्च पर्यंतच

Shares

अनेक शेतकऱ्यांची कृषिपंपाची थकबाकी वाढत असल्यामुळे महावितरणाने वीज खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कृषीपंपाची थकबाकी तसेच त्यावरील व्याज यामध्ये सवलत देत १५ हजार ९६ कोटी ६६ लाख रुपये माफ करण्यात आले असून देखील शेतकरी या योजनेचा लाभ घेत नाहीयेत.

मात्र नांदेड परिमंडळातील शेतकऱ्यांना या योजनेचे महत्व कळल्यामुळे तब्बल ३ हजार शेतकरी थकबाकी मुक्त झालेत. या योजनेत नांदेड परिमंडळातील १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
त्यांना चालू वीज बिल आणि मार्च २०२२ पर्यंतचे सुधारित थकबाकीपैकी केवळ अर्धी रक्कम म्हणजेच ५० % रक्कमच अदा करावी लागणार आहे.

नांदेड परिमंडळामध्ये हिंगोली, परभणी जिल्ह्यांचा समावेश होत असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध योजनेमध्ये आवर्जून सहभाग राहिला आहे.

यापूर्वी देखील कृषी विभागाकडून राबवण्यात आलेल्या ई-पीक पाहणी उपक्रमांमध्ये सर्वात जास्त संख्येने याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

आता महावितरणच्या कृषी ऊर्जा अभियानामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवर्जून सहभाग घेतला आहे.

थकबाकीदारांसाठी हीच सुवर्ण संधी

थकबाकीदार शेतकऱ्यांनी चालू वीज बिल तसेच मार्च २०२२ पर्यंतच्या थकबाकीचा ५० टक्के भरणा केला तर त्यामध्येही ५० टक्के सवलत ही मिळणार आहे.
त्यामुळे राज्यातील ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी तर या योजनेचा लाभ घेतला तर १५ हजार ३५३ कोटी ८८ लाख रुपये हे माफ होणार आहेत. या योजनेत सहभाग घेण्यासाठी शेवटची तारीख ३१ मार्च आहे.

वसूल केलेल्या थकबाकी मधून पायाभूत सुविधा

महावितरणकडून राबवण्यात आलेल्या कृषी ऊर्जा अभियानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वसूल करण्यात येणाऱ्या थकबाकीचा वापर त्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी करण्यात येणार आहे.

नांदेड परिमंडळामध्ये ९६ कोटी ६४ हजार रुपये थकबाकीचा भरणा करण्यात आला आहे.
या योजनेमध्ये तुम्ही ३१ मार्च पर्यंतच सहभाग नोंदवू शकता

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *