आता शेतकऱ्यांना मिळणार ४,००० रुपये…

Shares

केंद्र सरकार देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात ४,००० रुपये पाठवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतंर्गत (PM Kisan Scheme) नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या योजनेचा २,००० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यामध्ये पाठवला होता. आतापर्यंत सुमारे १० कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली आहे.

पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर एक अर्ज भरून नोंदणी केल्यावर केंद्र सरकार थेट तुमच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करेल.

कसे मिळवाल 4000 रुपये ?
शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत आहे. तुमचे नाव नोंदवले गेल्यानंतर एप्रिल-जूनचा हप्ता जुलै महिन्यात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नवा हप्ता जमा केला जाईल. म्हणजेच आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळू शकतील.

कशी करायची नोंदणी ?

  • सर्वप्रथम pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे.
  • Farmers Corner या ऑप्शनवर क्लिक करावे.
  • आता तुम्हाला New Farmer Registration हा पर्याय निवडावा लागेल.
  • नवा टॅब ओपन झाल्यावर त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक आणि सदरील बाजूस दिसणारा कॅप्चा कोड टाकावा.
  • त्यानंतर आपली माहिती आणि जमिनीचा तपशील नमूद करावा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.

लगेचच नाव नोंदणी करून ह्या योजनेचा लाभ घ्या आणि इतर शेतकऱ्यांना देखील सांगा…

-ब्युरो रिपोर्ट किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *