शेतीला आणि शेतकरी यांना कृषी ज्ञानाची आवश्यकता का ? एकदा वाचाच

Shares

नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आपला भारत हा कृ‌षिप्रधान देश आहे. आजही आपल्या महाराष्ट्रात सुमारे ६० ते ६५ टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. गावाकडील भागातील लोकांची जिविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे.  बरेचसे क्षेत्र हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खात्रीशीर उत्पादन मिळण्याची आशाच नसते. मर्यादित जमिनीचे क्षेत्र उपलब्‍ध असल्याने आणि सिंचनाच्या सुविधा मुबलक नसल्याने याच क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. शेतकरी आणि युवा वर्ग यांच्या संयुक्त प्रयत्नाने शेती उत्पादने वाढविणे शक्य होत आहे.शेती उत्पादन हे शेतीची आवश्यक मशागत, विविध निविष्ठांचा योग्य प्रमाणात आणि वेळेवर वापर या गोष्टींवर अवलंबून असते. कृषी उत्पादन वाढीसाठी मुख्यत्वे भांडवल, सिंचनाची व्यवस्था या कृषी निविष्ठा महत्त्वाच्या आहेत.

PM किसान सन्मान निधी: 13वा हप्ता कधी येणार, केंद्र सरकारने दिले हे संकेत, हे काम लवकर करा

त्यामुळे पेरणीसाठी सुधारीत बियाणे, खते, पीक किड व रोग संरक्षण करणारी औषधे उपलब्ध करता येतात. परंतु, कृषी निविष्ठांशिवाय महत्त्वाची आणि गरजेची कृषी निविष्ठा म्हणजे कृषी तंत्रज्ञान. महाराष्ट्रातील कृषी संशोधकांनी अभ्यास करून आणि विशेष परिश्रम घेऊन विविध विषयांसंबंधी सुधारित कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून करून दिले आहे. पिकांचे सुधारीत वाण, खताच्या मात्रा, पेरणीपध्दती, सिंचनपध्दती, पाणी व्यवस्थापन, अंतर्गत मशागत, पीक संरक्षण, जमिनीची मशागत, सुधारित अवजारे व यंत्रना आणि इतर शेतीसंबंधी विषयावर सुधारित तंत्रज्ञान संशोधनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच विविध पिके, भाजीपाला, फळशेती, फुलशेती, पशुसंवर्धन, चारा पिके आणि यांत्रिक शेती याबाबत मोठ्या प्रमाणात उपयुक्त कृषी तंत्रज्ञान आज उपलब्‍ध करणे हे आपल्या सर्वांना महत्त्वाचे आहे.

IMD कृषी सल्ला: यंदा हिवाळ्यात गव्हाचे उत्पादन घटू शकते, शेतकऱ्यांनी या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी

शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांनी उपलब्ध कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती उत्पादने वापरावेत, यासाठी कृषी खात्यामार्फत विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालये याविषयी प्रचार आणि प्रसार करीत असतातच. विविध माध्यमांचा वापर यासाठी केला जात आहे. शेतकऱ्याला कृषी तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी कृषी शिक्षण घेतले तर त्याचा निश्चितपणे फायदा होईल.

सर्वात महाग अंडी: 10-15 रुपयांना नाही, ही कोंबडीची अंडी 100 रुपयांना विकली जाते, अशी आहे

प्रत्येक व्यवसाय करताना त्या व्यवसायासंबंधी आवश्यक शास्त्रीय ज्ञान गरजेचे असते. शिक्षणाद्वारे मिळविलेल्या ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग निश्चितपणे यशस्वी होण्यासाठी होतो, हे सिध्द झाले आहे. आज वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन या विविध क्षेत्रात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील मिळविलेल्या ज्ञानाचा तसेच तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे उपयोग होत आहे. प्रत्येक क्षेत्रातील तंत्रज्ञान हे शास्त्रावर आधारीत असते. शास्त्र आणि तंत्रज्ञान यांची सांगड घातलेली असते. तंत्रज्ञानाचा वापर करताना त्या क्षेत्राशी संबंधित ज्ञानाची व शास्‍त्रीय माहिती महत्त्वाची असते. शेती व्यवसाय हा शास्त्र आणि कला कौशल यावर आधारीत आहे. म्हणून शेती शास्त्राची आणि त्यातील कौशल्याची माहिती करून घेणे शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. ही येणार्या काळाची गरज आहे……

कारल्याची लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात, जाणून घ्या शेतीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी

धन्यवाद

मिलिंद जि गोदे

milindgode111@gmail.com

विचारांची दिशा बदला

जिवनाची दशा आपोआप बदलेल.

कापसाला रास्त भाव नाहीच, जाणून घ्या बाजार भाव

सोयाबीनच्या दरात मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

यशोगाथा: भेटा ‘पद्मश्री’ सुंदरम वर्मा, जे केवळ एक लिटर पाण्यात झाडे लावून ‘शेतीचे जादूगार’ बनले.

राज्यातील विद्यार्थ्यांना सरकार 51 हजार रुपये देत आहे, असा लाभ घ्या

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *