सोयाबीनला ढगाळ वातावरणाचा फटका? आवक वाढली, जाणून घ्या आजचे दर

Shares

मागील ३ दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अनेक जागी अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी, मळणी आणि लगेचच विक्री असे धोरण केले आहे.

लातूर उत्पन्न बाजारसमितीमध्ये त्यामुळे शेतीमालाची आवक वाढली आहे. तर शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी विक्रीवर जास्त भर देत आहेत.

आठवड्याच्या शेवटच्या टप्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये चांगली सुधारणा झाली आहे. शेतकऱ्यांनी इतक्या दिवसापासून साठवणूक केलेला सोयाबीन आता विक्रीस काढला आहे. त्यामुळे सोयाबीनची आवक १० हजार पोत्यांवरून २५ हजार पोत्यावर गेली आहे. तर लातूर बाजार समितीमध्ये ७ हजार ३७० रुपये दर मिळत होता.

हे ही वाचा (Read This) अर्थसंकल्प २०२२-२३ – शेतकऱ्यांसाठीच्या या महत्वाच्या घोषणा, एकाच बातमीत

आजचे सोयाबीनचे दर

soybean bhav

सोयाबीनच्या दरात सुधारणा

मागील काही दिवसापासून सोयाबीनचे दर हे ७ हजार ३०० रुपयांवर स्थिर झाले होते. त्यानंतर सोयाबीनच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत होती. मात्र आता सोयाबीनच्या दरामध्ये ७० रुपयांची वाढ झाली असून आता सोयाबीन उत्पादकाला दिलासा मिळाला आहे.

सोयाबीनचे दर हे आता भविष्यात देखील असेच टिकून राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा (Read This) पिकांच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी गंधक महत्वाचे

हरभऱ्याची देखील विक्रमी आवक

यंदा हरभऱ्याचा पेरा विक्रमी क्षेत्रावर झाला असून त्याची आवक मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे. हरभऱ्याला हमीभाव केंद्रामध्ये ५ हजार २३० दर ठरवून दिला असला तरी बाजारपेठेमध्ये हरभऱ्यास ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० असा दर मिळत आहे.

मात्र हरभऱ्याची आवक ही जोरदार सुरु असून खुल्या बाजारात ४५ हजार पोत्यांची आवक झाली आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *