सोयाबीनचे दर स्थिर, हरभरा दरात वाढ

Shares

सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार होत होती मात्र आता महिन्याभरापासून दरामध्ये स्थिरता दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी गरजेनुसार सोयाबीनची विक्री करत आहेत. सोयाबीनचे दर आता असेच स्थिर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी हंगामाच्या अंतिम टप्यात सोयाबीन असल्यामुळे त्याची आवक वाढत आहे.

हे ही वाचा (Read This) सेंद्रिय शेतीबाबतचा मोठा संभ्रम दूर- सेंद्रिय शेतीची उत्पादकता केमिकलच्या तुलनेत २०% ते २५% टक्के जास्त ICAR

एकीकडे सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत तर दुसरीकडे हरभऱ्याच्या दरामध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. हरभरा ४ हजार ६०० रुपयांवरून आता ५ हजारांवर पोहचले आहे.

सोयाबीनचे आजचे दर

सुरुवातीला विक्रमी आवक

रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी होताच त्याची मोठ्या प्रमाणात आवक होत होती. मात्र आता दरात काहीही बदल होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा साठवणुकीकडे जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला हरभऱ्यास ४ हजार ६०० असा दर मिळत होता. आता हा दर ५ हजरांच्या आसपास आला आहे. त्यामुळे आता शेतकरी काय निर्णय घेणार हे बघण्यासारखे आहे.

हे ही वाचा (Read This) या पिकाची लागवड करा ३ वर्षे नो टेन्शन, मिळवा ६ लाखांपर्यंतचे उत्पन्न

हमीभावापेक्षा वाजारपेठेत कमी दर

तुरीच्या दरामध्ये मध्यंतरी वाढ झाली होती. मात्र हे दर टिकून राहिले नसून हे दर आता ७ हजार २०० वर येऊन स्थिरावले आहे. अवकाळी पाऊस आणि शेंग अळीच्या प्रादुर्भावामुळे तुरीच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे भविष्यात दर वाढतील असा आशावाद आहे.हमीभाव केंद्रामध्ये तुरीस ७ हजर ३०० असा दर मिळत आहे.

हे ही वाचा (Read This)  राज्यातील ‘या’ शहरात येणारी लाखोंची बनावट दारू जप्त

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *