शेतकऱयांना ३ महिन्यात मालामाल करणारे नगदी पीक.

Shares

भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मसाला पिकाची लागवड केली जात असून जगभर या मसाल्यांची निर्यात केली जाते तर मसाला निर्यातीमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांची लागवड केली जात असून यामध्ये हे मसाले अधिकचे उत्पन्न मिळ्वण्यासाठी उत्तम पर्याय आहे. मसाला पिकांमध्ये महत्वाचे असणाऱ्या काळ्या मिरीची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. काळ्या मिरीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ( International Market) मोठ्या संख्येने मागणीव असते. तर काळ्या मिरीच्या ( Black Pepper) लागवडीसाठी लागणार खर्च हा कमी असून त्याची लागवड पद्धत ही अतिशय सोपी आहे. देशात सर्वात जास्त म्हणजेच जवळ जवळ ९८ टक्के लागवड ही एकट्या केरळ मध्ये केली जात असून महाराष्ट्र, कर्नाटक, अंदमान निकोबार बेट , पॉंडिचेरी येथे देखील काळ्या मिरीची लागवड केली जाते. काळ्या मिरीचे पीक आंतरपीक म्हणून देखील घेता येते.

फळांच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून घेता येते काळ्या मिरीचे पीक
साधारणत: १० ते ४० अंशापर्यंत तापमान आणि आर्द्रतेचे प्रमाण हे ६० ते ७० टक्के असणे आवश्यक आहे. अशा वातावरणात काळी मिरचीची वाढ झपाट्याने होते. असे पोषक वातावरण हे किनारपट्टीच्या लगत असल्यामुळे केरळमध्ये सर्वाधिक क्षेत्र आणि उत्पादन दोन्ही अधिक आहे. सुपीक जमीन तिच्या लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते. शिवाय येथील शेतीचे पीएच मूल्य ४.५ ते ६ च्या दरम्यान असते म्हणून चांगले उत्पादन मिळते. मिरपूडची झाडे वेलीसारखी वाढतात. त्यामुळे त्यांची वाढ होण्यासाठी उंचच उंच झाडांची गरज असते. हेच कारण आहे की रिकाम्या क्षेत्रात काळी मिरचा न पेरता उंच झाडे असलेल्या बागांमध्ये लागवड केली जाते. काळी मिरीचीची दोन टप्प्यात पेरणी होते. पहिल्या टप्प्यात वनस्पती तयार होते आणि दुसऱ्या टप्प्यात रोपाचे प्रत्यारोपण केले जाते. दुसऱ्या टप्प्यातील मिरची ही झाडांच्या मुळाजवळ लावली जाते. त्यामुळेच वेलीप्रमाणे ती झाडावर वाढते आणि उत्पादनही अधिकचे मिळण्यास मदत होते.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ?
या पिकाचे रोप तयार करण्यासाठी जुन्या वेलीवरून या मिरचीची चटणी करावी लागते. तर छाटणी नंतर त्यास खताने आणि मातीने भरलेल्या पॉलिथिन मध्ये ठेवावे लागते. साधारणतः ५० ते ६० दिवसानंतर हे रोप तयार होते. याच्या लागवडीसाठी लांब आणि खोल खड्डा खोदून रोपवाटीकेनंतर त्यास लगेचच पाणी द्यावे लागते. पिकाच्या वाढीनंतर १५ ते २० दिवसातच त्याचे तण काढावे लागते. त्याच्या वेलींची वाढ झाल्यानंतर त्यावर हिरव्या रंगाचे गुच्छे दिसते. एकापेक्षा अधिक गुच्छे दिसले की नोव्हेंबर महिन्यात त्याची तोडणी करता येते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *