बागायती पिकांच्या उत्पादनात 2.1 टक्के वाढीचा अंदाज, कशी आहे बटाटा आणि टोमॅटोची स्थिती

Shares

फळांचे उत्पादन 102.4 दशलक्ष टनांवरून 1071 दशलक्ष टन आणि भाज्यांचे उत्पादन 200.4 दशलक्ष टनांवरून 204.6 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. भाजीपाल्यांमध्ये कांद्याचे उत्पन्न एका वर्षापूर्वीच्या २६.६ दशलक्ष टनावरून ३१.७० दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

फळे, भाजीपाला आणि मध उत्पादनात वाढ झाल्यामुळे 2021-22 या आर्थिक वर्षात देशाचे फलोत्पादन उत्पादन 2.1 टक्क्यांनी वाढून 3416 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात बागायती पिकांच्या उत्पन्नाची आकडेवारी देताना ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी बागायती पिकांचे क्षेत्र आणि उत्पन्नाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण फलोत्पादन 341.6 दशलक्ष टन असण्याचा अंदाज आहे, जे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे 703 लाख टन अधिक आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात फलोत्पादनाचे उत्पादन 334.6 दशलक्ष टन होते. कृषी मंत्रालयाच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार , 2021-22 या वर्षासाठी फलोत्पादनाचे उत्पादन 333.5 दशलक्ष टन अपेक्षित होते.

पीक विमा काढण्याची शेवटची तारीख ३१ जुलै, अशा प्रकारे करा ऑनलाइन नोंदणी

बागायती पिकांखालील क्षेत्र पूर्वी 27.4 दशलक्ष हेक्टरवरून 2.77 दशलक्ष हेक्टरपर्यंत वाढले आहे. “फळे, भाज्या आणि मधाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे, मसाले, फुले, सुगंधी आणि औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचे उत्पादन एक वर्षापूर्वीच्या तुलनेत वाढले आहे,” कृषी मंत्रालयाने म्हटले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, फळांचे उत्पादन 102.4 दशलक्ष टनांवरून 1071 दशलक्ष टन आणि भाज्यांचे उत्पादन 200.4 दशलक्ष टनांवरून 204.6 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. भाजीपाल्यांमध्ये कांद्याचे उत्पन्न एका वर्षापूर्वीच्या २६.६ दशलक्ष टनावरून ३१.७० दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. मात्र बटाटा आणि टोमॅटोचे उत्पन्न कमी राहण्याची अपेक्षा आहे. कांद्याचे उत्पन्न ५६.१ दशलक्ष टनांवरून ५३.५ दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी टोमॅटोचे उत्पादन २०३ दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे, जे एका वर्षापूर्वी २१.१ दशलक्ष टन होते.

मधुमेह : मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हे दोन मसाले दुधात मिसळून प्या

सफरचंद आणि पपईच्या उत्पादनातही वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पपईच्या व्यावसायिक लागवडीला प्रोत्साहन दिले जात असून ते शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे प्रमुख साधन बनत आहे. आंबा आणि केळीच्या उत्पादनातही भारत झपाट्याने प्रगती करत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा केळी उत्पादक देश आहे. यावेळी त्याचे उत्पादन चांगले वाढण्याची अपेक्षा आहे. आंब्याचे उत्पादनही वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर मोसंबीच्या उत्पादनातही मोठी वाढ झाल्याची चर्चा आहे. सरकार शेतकऱ्यांना पारंपरिक पिके घेण्याऐवजी बागायती पिके घेण्यास प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांना फळबागा लावण्यातही मदत केली जाते.

100 दिवसात वाढवा जमिनीचा सेंद्रिय कर्ब

भाजप शिंदे सरकारने नामांतराला दाखवला हिरवा कंदील, नामांतर होणारच !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *